ज्या भारताची अंधारी बाजूच सतत जगासमोर आणण्यात ब्रिटिशांनी यश मिळविले त्याची दैदीप्यमान बाजू नव्या जगाला प्रथम स्वामीजींनीच दाखविली.
ईश्वराच्या आज्ञा पाळणे व त्याला शरण राहाणे हेच त्याच्या उपासनेचे रहस्य आहे. त्याने ईशकृपा होते व साधकाच्या कल्याणाचे दरवाजे एकामागून एक उघडत जातात. सगुण साकार श्रीकृष्ण हा ईश्वराचा अवतार आहे. त्याच्या भगवद्गीतेतील आज्ञा पाळाव्या, त्याला शरण राहावे व त्याच्या अनुसंधानात प्रेमाने राहावे.
जिवाभाव जाऊन ब्रह्मभाव स्थिर होण्यासाठी म्हणजे विभक्ताचा भक्त होण्यासाठी देहांच्या उपाधीचा निरास होणे अनिवार्य आहे. सगुण भजनात अत्यंत प्रेमाने तल्लीन झाल्याने देहाचा निरास होतो.
आपले कर्तव्यकर्म चोख पार पाडीत असता जीवनात जे जे घडेल, ते ते ईश्वरी योजनेनुसार घडेल अशा विश्वासाने शांत चित्ताने रहाणे हे शरणागतीचे स्वरूप आहे. अशी शरणागती असेल तर मत्सर, स्पर्धा, तुलना, द्वेष इत्यादी विकार आपोआप दूर राहून समाधान टिकून राहते.
वेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.
वेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.
आत्मज्ञानाचा कोणताही विधी नाही. ते विधीच्या अधीन नाही. उदा. ‘स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा’ असा विधी सांगितला आहे. आत्मा नित्यप्राप्त असल्याने त्याचे ज्ञानही नित्यप्राप्तच आहे.
स्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा
परमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी "वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः।' असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात.
स्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा.
by Dr. Shrikrushna Deshmukh
Posted on July 2, 2016
हा ग्रंथ फारसा प्रसिद्ध नाही. जीवनमुक्ती स्थितीतील मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची ही रचना आहे. ते सुद्धा फारसे प्रसिद्ध नाहीत. ज्ञानदेवांच्या पूर्वीचे असून ते मराठीचे आद्य कवी होते. परमार्थाच्या संदर्भातील सुरुवातीची ओवी रचना त्यांनी केली असे मानले जाते. हा ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या पूर्वीचा आहे अशी त्याची एक ख्याति आहे. ग्रंथ परिचय :परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. परमामृत म्हणजे … Continue reading परमामृत १
Read Moreby Dr. Shrikrushna Deshmukh
Posted on July 2, 2016
प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति। इयें वोझीं नेघें मती। अखंड चित्तवृत्ती। माझ्या ठायी।। ज्ञाने.12-121।। ज्ञानेश्वरमहाराजांची ज्ञानेश्वरीतील ही एक ओवी आहे. ही ओवी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाला उपदेश करताना आलेली आहे. या ओवीचा सरळ अर्थ असा की “अमुक एका कर्मामध्ये प्रवृत्ती व अमुक एका कर्मामध्ये निवृत्ती झालीच पाहिजे अशा आग्रहाची ओझी तू आपल्या … Continue reading प्रवृत्ती आणि निवृत्ती
Read More