ज्या भारताची अंधारी बाजूच सतत जगासमोर आणण्यात ब्रिटिशांनी यश मिळविले त्याची दैदीप्यमान बाजू नव्या जगाला प्रथम स्वामीजींनीच दाखविली.
ईश्वराच्या आज्ञा पाळणे व त्याला शरण राहाणे हेच त्याच्या उपासनेचे रहस्य आहे. त्याने ईशकृपा होते व साधकाच्या कल्याणाचे दरवाजे एकामागून एक उघडत जातात. सगुण साकार श्रीकृष्ण हा ईश्वराचा अवतार आहे. त्याच्या भगवद्गीतेतील आज्ञा पाळाव्या, त्याला शरण राहावे व त्याच्या अनुसंधानात प्रेमाने राहावे.
जिवाभाव जाऊन ब्रह्मभाव स्थिर होण्यासाठी म्हणजे विभक्ताचा भक्त होण्यासाठी देहांच्या उपाधीचा निरास होणे अनिवार्य आहे. सगुण भजनात अत्यंत प्रेमाने तल्लीन झाल्याने देहाचा निरास होतो.
आपले कर्तव्यकर्म चोख पार पाडीत असता जीवनात जे जे घडेल, ते ते ईश्वरी योजनेनुसार घडेल अशा विश्वासाने शांत चित्ताने रहाणे हे शरणागतीचे स्वरूप आहे. अशी शरणागती असेल तर मत्सर, स्पर्धा, तुलना, द्वेष इत्यादी विकार आपोआप दूर राहून समाधान टिकून राहते.
वेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.
वेदांत गर्जून सांगतो की चैतन्य एकमेव असून त्याचे ठिकाणी द्वैताचा लेशही नाही. एक काहीतरी कळते, दुसरे काहीतरी आठवते हे सर्व ज्याच्यामुळे होते तो ज्ञानरूप आत्माच होय. तो असंग आसून अज्ञानाने लिप्त होत नाही.
आत्मज्ञानाचा कोणताही विधी नाही. ते विधीच्या अधीन नाही. उदा. ‘स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ करावा’ असा विधी सांगितला आहे. आत्मा नित्यप्राप्त असल्याने त्याचे ज्ञानही नित्यप्राप्तच आहे.
स्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा
परमार्थ हे कृतिपेक्षा विचारांचे शास्त्र आहे. भगवान शंकराचार्यांनी "वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित् कर्मकोटिभिः।' असे सांगितले आहे. माणूस कृतिशील असतो. पण कर्मामागचे वर्म समजून घेऊन कृती घडली तरच विचार बदलतात.
स्वेच्छा, अनिच्छा व परेच्छा अशा तीन प्रकारचे प्रारब्धकर्म आहे. त्यानुसार ज्ञान्यांचे वर्तन होऊन ते जगदुद्धाराचे कार्य करू शकतात. पण त्यात फळाच्या इच्छेचा मागमूसही नसतो. ही स्थिती येण्यासाठी मुमुक्षूने अखंड आत्मानात्मविचार करावा.
Posted on March 21, 2022
Date/Time
Date(s) - 21/03/2022 - 28/03/2022
12:00 am
Categories
प पू मंदाताई गंधे यांच्या शुभहस्ते, प पू डॉक्टर काकांच्या व श्रध्येय श्री प्रकाशजी मुळे शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत.एकनाथ षष्ठी शके १९४४ म्हणजे २३ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता, स्थळ :- शिवगड अध्यात्म ट्रस्ट मुरगुड.